नवी दिल्ली, ६ सप्टेंबर/विशेष प्रतिनिधी गरीबांना मोफत धान्य वाटणे सरकारला शक्य नाही, असे स्पष्ट करून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी धोरण निर्धारित करून त्याची अंमलबजावणी करण्याचा मुद्दा असेल तर त्यात सर्वोच्च न्यायालयाने दखल देऊ नये, अशी सूचना केली. सरकारी गोदामांमध्ये सडणाऱ्या धान्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर पंतप्रधान आज आपल्या निवासस्थानी निवडक संपादकांशी बोलत होते.
मुंबई, नागपूर, ६ सप्टेंबर/ प्रतिनिधी महागाई, कामगार कपात, बेरोजगारीला चालना देणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात प्रमुख आठ केंद्रीय संघटनांसह राज्यातील कामगार संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या परिणामी बँका आणि विमा कंपन्यांचे व्यवहार, सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प होण्याची शक्यता तसेच शाळा-महाविद्यालयांमधील उपस्थितीवर परिणाम दिसून येईल.
मुंबई, ६ सप्टेंबर/प्रतिनिधी भारतीय अणुक्षेत्रातील होमी भाभा, सतीश धवन आदी ज्येष्ठांबरोबरच आदराने उल्लेख केला जाणारे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि समकालीन भारतीय अणुक्षेत्राचे प्रेरणास्रोत होमी नुसरवानजी सेठना यांचे काल रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. १९७४ मध्ये पोखरण येथे भारताने केलेल्या पहिल्या अणुस्फोट चाचणीत सेठना यांचा महत्त्वाचा सहभाग होता. नवस्वतंत्र भारताची आण्विक महत्त्वाकांक्षा फुलविण्यात ज्या मोजक्या थोर अणुशास्त्रज्ञांनी अतिशय मोलाचे योगदान दिले त्यामध्ये डॉ. सेठना यांचे नाव आदराने घेतले जाते.
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर/विशेष प्रतिनिधी बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी येत्या २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरदरम्यान दिवाळीपूर्वी आणि छठ पूजेनंतर सहा टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. मतमोजणी आणि निकालाची घोषणा २४ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. आज सायंकाळी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी बिहार विधानसभेच्या निवडणूक वेळापत्रकाची घोषणा केली.
पुणे, ६ सप्टेंबर / विशेष प्रतिनिधी शेतमजूर व भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमिनी शर्तभंग करून खरेदी केल्याच्या प्रकरणांची माहिती घेण्यासाठी ‘लवासा’ त गेलेल्या सुनीती सु. र. आणि अन्य आंदोलकांवर सुमारे सव्वाशे ते दीडशे लवासा समर्थकांनी आज हल्ल्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून आंदोलक बचावले असले, तरी त्यांना मोठय़ा भयावह प्रसंगातून जावे लागले.
राज भेटलेच नाहीत, तर उद्धव म्हणाले.. शिवसेनेला कोणाची गरज नाही मुंबई, ५ सप्टेंबर / खास प्रतिनिधी मराठी माणसांच्या हितासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून ‘ठाकरे जोडो’ अभियानांतर्गत ‘माझी चळवळ, मी महाराष्ट्राचा’ या अभिनव चळवळीच्या वतीने आज उभयतांच्या निवासस्थावार मूकमोर्चा काढण्यात आला असता मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे घरीच नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. ‘मातोश्री’वर मोर्चा गेला असता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मोर्चेकरांना भेट दिली खरी, शिवसेनेला कोणाचीही गरज नाही, अशा शब्दांमध्ये स्पष्टपणे सुनावले. एकूणच ठाकरे बंधूंचीच एकत्र येण्याची इच्छा दिसत नाही, अशी भावना या चळवळीतील कार्यकर्त्यांची झाली आहे.
ठाणे, ५ सप्टेंबर/प्रतिनिधी दहीहंडी फोडताना छातीला मुका मार लागून, जखमी झालेला ठाण्याच्या ओमसाई मित्रमंडळ या संस्थेतील गोिवदा किशोर कांबळे (२०) या तरुणाचे आज सकाळी निधन झाले.ओमसाई मित्रमंडळातर्फे ठाण्यातील शास्त्रीनगर, यशोधननगर आणि सावरकरनगर या भागात लावलेल्या दहिहंडय़ा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात ज्ञानेश्वरनगरमधील संत रोहिदास चाळीतील राहणारा किशोर चौथ्या थरापर्यंत चढला होता. या प्रयत्नात तो चौथ्या थरावरून खाली पडला.
लंडन/कराची, ५ सप्टेंबर / वृत्तसंस्था पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यापासून फिक्सिंगविषयीच्या वृत्तांचा पाऊस सर्वत्र पडू लागला आहे. ब्रिटनच्या न्यूज ऑफ द वर्ल्ड या वर्तमानपत्राने बुकी माजिदचे स्टींग ऑपरेशन केल्यानंतर आज पुन्हा याच वर्तमानपत्राने पाकिस्तानचा सलामीवीर यासिर हमिदची मुलाखत प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळात नव्या चर्चा रंगल्या, प्रतिक्रिया उमटल्या.
रविवार, ५ सप्टेंबर २०१० विजयाचा उन्माद पचविण्यासाठी पराभवाचे अश्रू गिळण्यासाठी कधीतरी, अंधाऱ्या वाटेला प्रकाश म्हणून कधीतरी, निराशेतही तगणारी आच म्हणून आजी-आजोबा आई-बाबा मित्र-मैत्रीण सखा-सहचारी सगळेच जेव्हा बोटभर कमी पडतात तेव्हा तुम्हीच असता पाठीवर हात ठेवून ‘लढ’ म्हणण्यासाठी तुमचा हात सदैव पाठीवर असू द्या मग मी कधीच ‘पाठी’ राहणार नाही!
पुणे, ४ सप्टेंबर/ विशेष प्रतिनिधी मराठी शाळांना परवानगी न देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करून मराठी शाळांच्या बचावासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. हजारो विद्यार्थी पालकांसह स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी १९ जूनच्या परिपत्रकाची राज्यभर होळी केली आणि मराठी माध्यमातून शिकण्याच्या मूलभूत हक्कासाठी रणशिंग फुंकल्याचे जाहीर केले.
प्रदीप आपटे - शनिवार, ४ सप्टेंबर २०१० वनस्पतींमध्ये गंधांच्या बहुढंगी छटा सुप्तपणे नांदत असतात. वानसाच्या पेशींची रचना विस्कळली. त्याला मेद, पाणी यांचा उष्म्यासकट संपर्क आला की त्यांची हजेरी जाणवत असते. एकाच वनस्पतीमध्ये अगदी निराळ्या ठेवणीच्या गंधाचे गुच्छ कोंदलेले असतात. उदा. नेहमीच्या परिचयातला गवती चहा घ्या. त्यामध्ये एकाच वेळी संत्रा, लिंबू, फळवर्गी गंध असतात आणि गुलाब फूलवर्गीही!
निरंजन घाटे - शनिवार, ४ सप्टेंबर २०१० एलिझाबेथ एस. व्हर्बा यांचा जन्म जर्मनीत झाला. त्यांचं बालपण नामिबियातील एका काराकुल प्रजातीच्या मेंढीफार्मवर गेलं. केपटाऊन विद्यापीठात १९६४ साली त्यांनी प्राणिशास्त्र आणि गणिती संख्याशास्त्रातील पदवी मिळवली. त्यानंतर लगेचच प्रिटोरियाच्या ट्रान्सव्हाल संग्रहालयामध्ये त्या संग्रहालय साहाय्यक या पदावर काम करू लागल्या. जीवाश्म साफ करणे, जेवढे तुकडे उपलब्ध असतील ते जुळवून त्यांना पूर्ववत सांधण्याचा प्रयत्न करणे अशी कामे सुरुवातीला त्यांच्यावर सोपविण्यात आली. संग्रहालयातल्या कामात त्यांनी चांगलीच गती दाखवली. त्यामुळं भराभरा वरची पदं मिळवत त्या पॅलिओ अँथ्रोपॉलॉजी म्हणजे पुरामानवशास्त्र विभागाच्या प्रमुख झाल्या.
डॉ. अनघा लवळेकर - शनिवार, ४ सप्टेंबर २०१० analav_jp@yahoo.co.in प्रिय सस्नेह नमस्कार, आपल्या पहिल्या परिचयाला आणि मैत्रीच्या नात्याला आज बारा वर्षे पूर्ण झाली. त्या सगळ्या सुंदर, आनंदी प्रवासाच्या आठवणींना उजाळा मिळावा आणि हा मैत्रीचा कल्पवृक्ष नित्य बहरत राहावा, म्हणून हा पत्रप्रपंच! तू म्हणशील, मैत्री तर हजारोजणांची असेल, त्यात काय विशेष? पण खरं सांगू, माझी-तुझ्याशी असलेली मैत्री फार-फारच वेगळी आहे. ती फक्त तुझ्याशी नाही; तर तुझ्या निमित्तानं ती माझ्या आजूबाजूच्या सगळ्या समाजाशी जोडली गेली आहे, हेच तर तिचं वैशिष्टय़. आता तू फक्त निमित्त आहेस. तुझ्यातून जोडलेली ही समाजमैत्री मला माझ्या पुढच्या जगण्यासाठीचा उद्देश देत गेली आहे.
डॉ. सलील कुलकर्णी - शनिवार, ४ सप्टेंबर २०१० saleel_kulkarni@yahoo.co.in ‘जीवनसन्मान पुरस्कारासाठी मराठी भावसंगीताचे पितामह दादासाहेब आचरेकर यांच्यासारख्या गायकाची झालेली निवड म्हणजे त्यांचा सन्मान नसून या जीवनसन्मान पुरस्काराचा तो सन्मान आहे. लहान मुलांपासून ते माझ्या आई-वडिलांच्या जागी असणाऱ्या तुम्हा रसिकांपर्यंत साऱ्यांच्याच मनावर राज्य करणारा दादासाहेबांचा आवाज म्हणजे निसर्गाचा चमत्कार आहे. आमच्या आधीच्या मंडळींकडून दादांच्या कार्याकडे दुर्लक्ष झालंय हे खरं, पण आम्ही मात्र त्यांना सर्वतोपरी सुविधा आणि सन्मान देऊ. हा ‘माझा’ शब्द आहे.’टाळ्यांचा कडकडाट.. व्हीलचेअरवर बसून दादासाहेब टाळ्या वाजवणाऱ्या असंख्य ठिपक्यांकडे एकटक बघत होते..
राजीव तांबे - शनिवार, ४ सप्टेंबर २०१० rajcopper@gmail.com घाणीच्या ढिगातून वाहणारं गटाराचं पाणी. या पाण्यात आडव्यातिडव्या विटा टाकून केलेला रस्ता. नाक मुठीत धरून या विटांवरून उडय़ा मारत त्या वस्तीत गेलो. सगळीकडे कचऱ्याचे डोंगर, घोंगावणाऱ्या माश्या आणि हवेत तरंगणारे डासांचे पुंजके. तिथे एका पत्र्याच्या शेडमध्ये शाळा चालायची. आठवडय़ातून एक दिवस तरी मी तिथे जावे, असे ती शाळा चालवणाऱ्यांनी मला सुचवले होते.ही परिस्थिती पाहून तर मी हबकलोच. तिथली ती गलिच्छ वस्ती पाहून मी मनातल्या मनात ठरवलं की, आज झालं एवढं बास झालं. पुन्हा इथे यायचं नाही. पण पहिल्याच दिवशी असा काही प्रसंग घडला की, मला माझा विचार बदलावा लागला.
डॉ. मेधा राजगुरू - शनिवार, ४ सप्टेंबर २०१० ‘सानिका, थोडी तरी घरातल्या कामांना मदत करत जा नं, बघ वजन किती वाढत चाललंय!’ ‘संकेत, जरा तोंडावर ताबा ठेवायला शिक, ते पोट बघ कसं दिसायला लागलंय!’ या उद्गारांवरून लक्षात आलंच असेल की, वाढत्या वयाबरोबर या मुलांचं वजनही वाढतंय आणि त्याचा ताण घरातील लोकांना येतोय.अलीकडे वाढत्या वजनाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
रेणू दांडेकर - शनिवार, ४ सप्टेंबर २०१० मुख्याध्यापिका, लोकमान्य टिळक विद्यामंदिर, चिखलगाव, दापोली उद्या शिक्षकदिन. त्यानिमित्त यंदा आम्ही एक प्रयोग केला आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील काही शाळांतील विद्यार्थ्यांना लिहिते केले आहे. शिक्षक, शाळा, शिक्षणपद्धती यांबद्दल मुलांना काय वाटते, ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. मुलांच्या या अभिव्यक्तींतून काही गोष्टी प्रकर्षांने जाणवल्या. मुलांना त्यांची शाळा व शिक्षक यांच्याविषयी मनोमन आदर असतो. तरीही त्यांना काही गोष्टी खटकत असतात, काही वेगळे सुचवायचे असते. शाळाव्यवस्थापनावर वा शिक्षकांवर दोषारोप न करता, चांगल्या रीतीने मुले त्यांच्या अपेक्षा व्यक्त करतात.
शनिवार, ४ सप्टेंबर २०१० शाळेतील शिक्षकदिन जवळ येत चालला होता. एका दिवसासाठी शाळेचा संपूर्ण कारभार आम्ही विद्यार्थी सांभाळणार होतो. सगळे मित्र, मला आग्रह करत होते की, मी शिक्षक म्हणून काम करावे. परंतु फक्त एक दिवसासाठी शाळेचा शिक्षक म्हणून काम करण्याऐवजी मला कायमचा शिक्षक होणे अधिक आवडेल.
शनिवार, ४ सप्टेंबर २०१० ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेली, लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या कार्यनिष्ठेचा ठसा असलेली, अलीकडेच ‘आयएसओ-९००१’ प्रमाणपत्र मिळालेली बारावीपर्यंत शिक्षण देणारी ही शाळा- धनाजी नाना विद्यालय, खिरोदा, जळगाव. या शाळेतील मुलांची ही अभिव्यक्ती- मी एका खेडय़ातील विद्यार्थी.लहानपणी जेव्हा जेव्हा मी आई-बाबांसोबत शहरात जायचो, तेव्हा शहरातील शाळा पाहिल्या की मला नेहमी वाटायचं, माझी शाळा कशी असावी? मग मी स्वप्न रंगवू लागायचो.
शनिवार, ४ सप्टेंबर २०१० जबाबदार पिढी घडवेन शाळा प्रदूषणमुक्त असावी. त्या शाळेमध्ये विविध विषयांसाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळा असाव्यात. शाळेला मोठे क्रीडांगण असावे. शाळेमध्ये निसर्गरम्य वातावरण असावे. शाळा गावापासून दूर असावी व तेथे लोकवस्ती असू नये. गोंगाट नसावा. त्या शाळेचे लक्ष्य विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षक घडविणे, हे असावे. शाळेमध्ये मिलिटरीचे प्रशिक्षणही देण्यात यावे. शाळेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. शाळेत स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात यावा. स्वातंत्र्याचे महत्त्व काय हे मुलांमध्ये ठसवले जावे, म्हणजे विद्यार्थ्यांना वाटेल की आपण भारतासाठी चांगले काहीतरी केले पाहिजे.
अरविंद पंचाक्षरी, नाशिक - रविवार, ५ सप्टेंबर २०१० अचूक निर्णयाने संरक्षण पंचमात सूर्य-बुध, भाग्यात राहू विशेष आकर्षक ग्रहस्थिती म्हणजे रविवारपासून सुरू होणारा मंगळ- शुक्र सहयोग व्यवहारात नवा उत्साह निर्माण करेल. स्थगित योजनांना वेग देता येईल. प्रापंचिक विवंचना, आर्थिक कुचंबणा असे प्रकार दूर होतील. त्यामुळे अचूक निर्णयातून संरक्षण व्यवस्था मजबूत करू शकाल. नाराज गुरू, शनीचा हस्तक्षेप बराच कमी होईल. आरोग्यावर लक्ष ठेवा. धर्मकार्यातून आनंद मिळवता येईल. दिनांक : ७, ८, ११ शुभकाळ. महिलांना : अडचणीतून बाहेर पडाल. कार्यभाग साधता येईल.
कृतीत यश पंचमात शनी, लाभात गुरू यांच्या शुभ परिणामांच्या आधाराने जमतील तेवढी प्रकरणे मार्गी लावणे योग्य ठरेल. चतुर्थात रवी, बुध, अष्टमात राहू असल्याने मधे मधे विघ्न येतच राहतील. परंतु निर्धाराने पुढे सरकत राहा. रविवारी मंगळ षष्ठात प्रवेश करीत असल्याने शत्रूंना जरब बसेल. काही विघ्न निश्चित कमी होतील. व्यापार, शिक्षण, समाजकार्य, मिळकतीचे वाद, या संबंधातील कृती यशस्वी करता येईल. शुक्रवारच्या मंगळ- नेपच्यून नवपंचम योगाच्या आसपास यश मिळेल. दिनांक : ५, ६, ९, १० शुभकाळ. महिलांना : सामोपचाराने संधी साधा.
उत्साह वाढेल, यश मिळेल पराक्रमी रवी, बुध, दशमात, गुरू रविवारी मंगळ पंचमात प्रवेश करील आणि मिथुन व्यक्तींचा उत्साह वाढू लागेल. त्यातून महत्त्वाचे निर्णय कृतीत आणून चकीत करणारे यशही मिळवता येईल. शुक्रवारच्या मंगळ- नेपच्यून नवपंचम योगाच्या आसपास याचा प्रत्यय प्रकर्षांने येईल. आर्थिक, व्यावसायिक, राजकीय क्षेत्रात बाजी मारता येईल. कलावंत चमकतील. शिक्षणातील समस्या दूर होतील. चतुर्थात शनी असल्याने प्रापंचिक प्रश्न सर्वाना बरोबर घेऊन सोडवावे लागतील. भक्तीमार्ग आनंद देईल. दिनांक : ५ ते ८ शुभकाळ. महिलांना : सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातचमकाल. प्रवास कराल.
शुभ परिणाम व्यापक होतील पराक्रमी शनी, भाग्यात गुरू, सिंह राशीत सूर्य, बुध यांचे शुभ परिणाम रविवारी सुरू होत असलेल्या शुक्र- मंगळ सहयोगातून अनेक क्षेत्रातील कर्क व्यक्तींच्या प्रत्ययास येत राहतील. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, व्यावसायिक विभागात नवे पराक्रम करता येतील. शुक्रवारच्या मंगळ- नेपच्यून नवपंचम योगाच्या आसपास काही पराक्रम प्रसिद्धीने झगमगून निघतील. विज्ञान आणि धर्म यामध्ये नवा प्रकाश दृष्टीपथास येईल. शत्रूंना संधी मिळतील अशा कृती टाळा. राहू, केतूचा त्रास कमी होईल. दिनांक : ६ ते १० शुभकाळ. महिलांना : घरात प्रसन्नता राहील. नवीन उपक्रम सुरू होतील.
सफलता मिळेल राशीस्थानी सूर्य-बुध, रविवारपासून शुक्र-मंगळ सहयोग सुरू होईल आणि सिंह व्यक्तींच्या प्रयत्नात उत्साह प्रकटेल. त्यातून स्थगित योजनांना वेग देता येईल. अभिनव उपक्रमांची रुपरेषा निश्चित करता येईल. राजकीय सत्ता प्रबळ करू शकाल. कला, साहित्य, शिक्षण यामध्ये आघाडीवर राहाल. साडेसाती, आठवा गुरू यांची अनिष्ठता सत्य आणि संयम यांच्यातून नियंत्रित करता येईल. मंगळ- नेपच्यून नवपंचम योग विज्ञान आणि उपासना यामध्ये चमत्काराचा ठरू शकतो. मन प्रसन्न राहील. दिनांक : ७ ते ११ शुभकाळ. महिलांना : शनिवापर्यंत अपेक्षित यश मिळवता येईल.
चक्रातून बाहेर पडाल साडेसाती, चतुर्थात राहू आणि व्ययस्थानी रवी, बुध यांच्यामुळे प्रपंच, प्राप्ती, प्रतिष्ठा या संबंधात तणाव राहतो. निर्णय कृतीमधील यश संशयात सापडते. तरीही गुरूची कृपा आणि रविवारपासून सुरू होणारा मंगळ- शुक्र सहयोग यांच्यामुळे या सर्व चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधता येईल. परिचित आणि कुटुंबिय त्यात सहभागी होतील आणि शुक्रवारच्या मंगळ- नेपच्यून नवपंचम योगाच्या आसपास सफलतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपला प्रवेश झालेला असेल. दिनांक : ५, ६, ९, १० शुभकाळ. महिलांना : अडथळ्यांच्या शर्यतीमधूनच मार्ग शोधावे लागतील.
कार्यभाग साधा रविवार राशीस्थानी मंगळ- शुक्र एकत्र येत आहेत. लाभात सूर्य, बुध आणि पराक्रमी राहू रागरंग बघून झटपट कार्यभाग साधला तर पुढचा प्रवास सोपा होईल. त्यामध्ये शुक्रवारचा मंगळ- नेपच्यून नवपंचम योग प्रबळ सहकार्य करू शकेल. साडेसाती, गुरू नाराज असल्याने स्पर्धा, साहस, प्रलोभनं असले प्रकार टाळावेच लागतात. शनिवारी चंद्र- शुक्र-मंगळ यांची युती व्यापार, अर्थप्राप्ती, नवे करार यातील आपल्या अपेक्षा सफल करणारी ठरेल. दिनांक : ५ ते ८ यश मिळेल. महिलांना : निर्णय, कृतीला विलंब नको. यश मिळेल.
प्रशंसनीय सफलता पंचमात गुरू, दशमात रवी, बुध आणि लाभात शनी आहे. व्यवहाराची समीकरणे या अनुकूल ग्रहांमुळे सहज सोडवता येतील. नवीन संपर्क, चर्चा यांच्यातील सफलता बौद्धिक क्षेत्रात आणि व्यापारी प्रांतात प्रशंसनीय ठरावी. राजकीय शक्ती प्रबळ होईल. अचानक प्रवास होतील. रविवारी व्यवस्थानी मंगळ- शुक्र सहयोग सुरू होत असल्याने छोटय़ा-मोठय़ा कार्यात अपेक्षेपेक्षा अधिक खर्च करावा लागेल. परमेश्वरी चिंतनात मंगळ- नेपच्यून नवपंचम योग चमत्काराचा ठरू शकतो. दिनांक : ६ ते १० शुभकाळ. महिलांना : प्रयत्नाने प्रश्न सोडवता येतील.
अविस्मरणीय ग्रहकाळ भाग्यात सूर्य, बुध, दशमात शनी, रविवारी लाभात मंगळ- शुक्र सहयोग सुरू होईल. धनु व्यक्तींना फार वर्षांनी एवढी चांगली ग्रहस्थिती लाभली आहे. बरीच मोठी कार्ये नजीकच्या काळात आपल्या हातून घडणे शक्य आहे. प्रत्येक दिवस व्यापार, राजकारण, कला, साहित्य, शिक्षण, अर्थप्राप्ती यामध्ये महत्त्वाचा ठरणारा आहे. गुरुकृपेने धर्मकार्यातून आनंद मिळेल. मंगळ- नेपच्यून नवपंचम योग विज्ञानात चमत्काराचा ठरतो. मोठे प्रवास होतील. प्रतिष्ठितांशी परिचय वाढतील. दिनांक : ७ ते १० अविस्मरणीय घटना संभवतात. महिलांना : ‘कराल ती पूर्व’ असा ग्रहकाळ आहे. त्याचा दूरदृष्टीने लाभ उठवा.
गाडी पुढे सरकत राहील भाग्यात शनी, दशमात शुक्र- मंगळ सहयोग सुरू होईल. गुरूची अनुकूलता आहेच. व्यवहाराची गाडी पुढे सरकत राहणारच आहे. नवे प्रस्ताव समोर येतील. आर्थिक प्रगतीचा वेग वाढेल. परिवारातील प्रश्न मार्गी लावता येतील. शिक्षणात यश मिळेल. व्यापाराचे चित्र आकर्षक करता येईल. अनिष्ठ राहू, केतू अष्टमात सूर्य, बुध असेपर्यंत काहीतरी कुरापती काढून त्रास देतील. पण मार्ग बदलू नका. पुढच्याच सप्ताहात यश अधिक सोपे होईल. दिनांक : ५, ६, ९, १० शुभकाळ. महिलांना : मुलांच्या संबंधातील काळजी दूर होईल. प्रवास होतील. मनासारख्या घटना घडतील.
नेत्रदीपक यशाचा काळ मीन राशीत गुरू, भाग्यात मंगळ- शुक्र एकत्र येत आहेत. लाभात राहू, सप्तमात रवी, बुध आहे. अशावेळी निर्णय घ्या कृती करा, प्रयत्नांचा वेग वाढवा. नेत्रदीपक यशाने कर्तृत्व उजळून निघेल. व्यापार, राजकारण, शिक्षण, साहित्य, विज्ञान, कलाविश्व यातील कुंभ व्यक्ती भाग्यवानच ठरतील. अष्टमात शनी असल्याने छोटी-मोठी प्रकरणे, शासकीय नियम व्यत्यय आणतील, पण सत्य सोडू नका. तज्ज्ञांचे मार्गदर्शन ठेवा. व्यत्यय दूर करता येतील. मंगळ- नेपच्यून नवपंचम योग शोधकार्यात अविस्मरणीय सफलता देतो. दिनांक : ७, ८, ११ शुभकाळ. महिलांना : निर्धाराने उपक्रम सुरू ठेवा. श्रेष्ठत्व सिद्ध करणारे यश मिळेल.
प्रयत्नातून आनंद राशीस्थानी गुरू, दशमात राहू, सप्तमात शनी; यांच्या प्रतिक्रिया सत्कारणी प्रयत्नांचा आनंद देतील. परंतु अष्टमात शुक्र- मंगळ सहयोग सुरू होत असल्याने उपक्रम आणि वेळापत्रक यामध्ये साहसी प्रयोगांचा समावेश करू नका. त्यामुळे शनिवापर्यंत कमी-अधिक वेगाने आपणास पुढे पुढे सरकता येईल. त्यात व्यापारी घडी बसेल. राजकीय शक्ती वाढेल. आर्थिक प्रगती होईल. नवीन खरेदी निश्चित करता येईल. विज्ञानातील समीकरणात सध्या बेसावध राहू नका. धार्मिक कार्यात चुका करू नका. दिनांक : ५, ६, ९, १० शुभकाळ. हिलांना : शुभवार्ता समजतील.